समचरण दृष्टी विटेवरी साजरी| तेथे माझी हरी वृत्ती राहो||१||
आणिक नलगे मायिक पदार्थ| तेथे माझे आर्त नको देवा||२||
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म| जे जे कर्मधर्म नाशिवंत||३||
तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला आपले दैवत मानले. पांडुरंगाची मनापासून भक्ती करू लागले. त्यामुळेच त्यांना असे वाटते कि ज्याचे, विटेवर उभे राहिल्यावर चरण व दृष्टी सरळ व सुशोभित आहे त्याचठिकाणी माझी वृत्ती (मन) राहो. ह्याहून निराळे मायिक पदार्थ आहेत. मायिक पदार्थ म्हणजे माया (मोह) उत्पन्न करणारे पदार्थ(सोने,चांदी,धन-दौलत) त्या ठिकाणी माझी इच्छा किंवा मन जावू नये.ह्यातून असे सूचित होते कि माणसे विनाकारण आपल्या सुखासाठी मायिक पदार्थांच्या मागे लागले आहेत पण हे पदार्थ नाशवंत आहेत पण खरे सुख तर पांडुरंगाच्या चरणी व त्याच्या डोळ्यात दिसत आहे व हे सुख नाशवंत नाही हे वर्म तुकाराम महाराजांना कळले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा